घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?
शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त…
१४ हजार शाळा बंद करून गुरुजी लागले कुत्र्यांच्या मागे!जनगणनेचा “फडतूस” उत्सव
महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून! ✍🏼 गजानन खंदारेमास्तर उर्फ गुरुजींना आमचा अष्टांग-स्पर्श!…आणि अंध-भक्तांना आशीर्वाद!गुरुजी,संक्रांत जवळ आली आहे.वाण घ्यायचं आहे,पण त्याआधी आपल्यालाएक अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्यपार पाडायचं आहे—एव्हाना “फडतूस” सिस्टमचा निरोपआपल्यापर्यंत पोहोचलाच असेल.कुत्र्यांची जनगणना! लग्नासाठी स्थळ शोधताय? मग इथे सर्वच मोफत आहे. Click here 💥 … व्हय,! खरंय ते..विद्यार्थी स्क्रोलिंगमध्ये निपुण झाल्यानेमास्तरांना आताकुत्र्यांची जनगणना…
“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?
धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…
महाराज त्रास सगळ्यांनाच होतो तर..!
सध्या इंदुरीकर महाराज हे टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातच त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवू व लग्नाचा बार याही पेक्षा थाटात उडवू..! अशी धमकीच त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “कथित अवलादी” ना दिली!पण महाराज…किर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा. “नाचू कीर्तनाचे रंगी..”म्हणत संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली. “दया धर्म” सांगणारेकिर्तन कशासाठी? तर वरील अभंगात त्याचा सार…
राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..
माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…
लोढाईच्या माळावर: गर्दीचा बाजार!
अश्विन शुद्ध नवमीला मी लोढाईच्या माळावर दर्शनासाठी गेलो होतो. त्या दिवशी इथे दरवर्षी एकदिवसीय मोठी यात्रा भरते. “लोढा-आई”चा माळ म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण – हिरवीगार टेकडी, जंगलाचं कवच आणि सभोवताल पसरलेलं गायरान व जंगल क्षेत्र . इथलं मंदिर हे केवळ दगड-विटांचं बांधकाम नाही, तर ग्रामीण लोक आणि कृषी संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे….
“दाढीवाल्या बाबाची” खरी खुरी गोष्ट!
आमचा दाढीवाला बाबा : गजानन भोयर 🚩 आजच्या काळात “दाढीवाले बाबा” ही संज्ञा लोकांना दोन अर्थांनी ठाऊक आहे. एक म्हणजे जनतेला स्वप्नं दाखवून फसवणारे, सत्तेसाठी झगडणारे आणि रोज नवे भ्रम पेरत मुर्ख बनवणारे बाबा. दुसरीकडे अध्यात्म, प्रवचनं आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांच्या श्रद्धेचं शोषण करणारे बाबा.सध्या देशात या बाबांचं अक्षरशः पीक आलंय. झोळी वाल्या फकीर बाबा…
गुलामीचे नवे रूप | “बायकोचा बैल ते सरकारचा बैल “
“…लाडक्या बहिणींना आता लाभासाठी e-kyc करणे बंधनकारक आहे. असे फर्मान सरकार नावाच्या व्यवस्थेने १८ तारखेला भल्या पहाटेच्या शपथ विधी प्रमाणे झोपेतून उठून जारी केले … ”आणि e-पिक पाहणीच्या अप्लिकेशन प्रमाणे हे पोर्टल सर्वर सुद्धा अख्खा ७५० मिली पिऊन झोपल्यागत “बम्पर कोडींग” घालून “ओव्हर लोड” केले . लहान लेकराच्या मुड प्रमाणे आमच्या सरकारला कधी आणि कुठे…
झोळी वाले उर्फ योगायोग बाबां -शेवट पहा
एखाद्या संघटनेची बांधणी करताना त्यामागे फक्त नाव, पद किंवा प्रसिद्धीचा मोह नसावा . त्या मागे असतो समाजहिताचा ठाम संकल्प असावा लागतो. निस्वार्थ भावनेचा जाज्वल्य जिव्हाळा आणि इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याची अखंड ऊर्जा. संघटनेत कार्य करणारी व्यक्ती म्हणजे एक चालतं–बोलतं उदाहरण असतं—ज्याला आपले स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी जगण्याची ओढ असते.परंतु ही वाट तितकी सोपी नसते. एखादी…
१० मिनिटांत आयुष्य संपवणारा;अचानक मृत्यू का वाढतोय?
“मरण दाराशी आले, त्याला म्हणतो. ये तुला १०० वर्ष आयुष्य आहे. आणि मग मरणही चाट पडतं, म्हणाले काय हा मनुष्य आहे !” अशीच काहीशी आपली जगण्याची आणि वागण्याची अवस्था झाली आहे .माणसे ,तरुण ,विद्यार्थी स्त्रिया चालता बोलता मृत्युच्या दारात जात आहेत .आपण मात्र त्याला अजूनही हलक्यात घेतो आहे.” मृत्यू इतक्या सहजपणे दार ठोठावतो आहे. कि…
