श्रावण नव्हे भक्ती मास — शिवभक्तीची खरी वाट कोणती?

“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….

Read More

बस मध्ये खाद्यपदार्थ विकून तो आपला उदरनिर्वाह करू शकत असेल का?

✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम  👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…

Read More

चार झाडांचा “प्रसाद” आणि सावलीचा संकल्प

सुरवातीचे ताजे कलम- खालील मजकूर हा उपहासात्मक आणि वैयक्तिक निरीक्षणा वर आधारित आहे. याचा कुठल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य कुठल्याच घटकाशी दुरान्वये ही संबंध नाही. योगाने केवळ लोकशाहीतील संवेदनशीलतेचा आग्रह किंवा अन्वयार्थ म्हणुन गेंड्याची कातडी ओढलेल्या “लोक व प्रशासन व्यवस्थेतील” जबाबदार सेवकांनी स्वतःच्या जबाबदारी प्रती इमान ठेवायला आमची काही हरकत नाही- गजानन रिसोड ✍ पटतंय…

Read More

सरकारी परवानगीची आधुनिक सावकारी: कायद्याच्या आडून शोषणाचा नवा चेहरा

परभणीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न, त्यामागील वित्तीय कंपनींची बेकायदेशीर व असंवेदनशील वागणूक, आणि ‘सावकारी बंद झाली’ असा सरकारचा दावा.. सरकारी परवानगीने आधुनिक सावकारी कशी बोकाळली आहे, याचा हा थोडक्यात आढावा परभणी जिल्ह्यातील पाथरा गावात नुकतीच घडलेली एक घटना पुन्हा एकदा राज्याच्या आणि देशाच्या शेतकरी धोरणांना सवाल करते. शेतकरी शाम साहेबराव काकडे यांनी ट्रॅक्टरसाठी महिंद्रा फायनान्सकडून घेतलेल्या…

Read More

नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…

Read More

महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

“पप्पा! तुम्ही कलेक्टर झालात का?” – हा प्रश्न साधनाने रागाने नव्हे, तर असहायतेने विचारला होता. हा एका मुलीचा आक्रोश होता – जिथे तिच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं जड झालं होतं. तिने वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी नाकारली, पण त्याच्या बदल्यात तिला माफही केलं नाही गेलं. हे एका पिढीच्या संवेदनशीलतेला न समजून घेतलेल्या पिढीचं भीषण उत्तर होतं. ही…

Read More

११ लाख अडकले, आणि वडिलांनी प्राण सोडले – मल्टीस्टेट बँकांची विश्वासघातकी यंत्रणा का?

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक हृदयद्रावक घटना महाराष्ट्राच्या वित्तीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकते. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर साठवलेली ११ लाख रुपये खासगी मल्टीस्टेट बँकेत अडकली, आणि निराश, हतबल झालेल्या वडिलांनी बँकेच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केवळ एक आत्महत्या नाही, तर आर्थिक व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि नियमनाच्या अभावामुळे घडलेला ‘संस्थात्मक खून’ आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या…

Read More

एकटा बच्चू सरकारवर भारी! पण त्याने नेमकं काय कमावलं…?

शिवरायांची परंपरा अन शंभूराजांचं वारसत्त्व – आंदोलनाचा नवा अध्याय! आज महाराष्ट्राच्या मातीत एक नव्या लढ्याची, नव्या झुंजीची साक्ष घडते आहे. जनतेच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी, बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन केवळ एक राजकीय उपोषण नाही, ही हाक आहे त्या विसरलेल्या आश्वासनांना – जी सरकारने निवडणुकीआधी दिली आणि आता कचऱ्याच्या पेटीत टाकली…

Read More

ऑटो युनियनने मेसेज फिरविला,अन…

ऑटो युनियनने मेसेज फिरविला, अन… 👉 शनिवारी मला हॉस्पिटलच्या कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. वाशिम वरून कोल्हापूर – नागपूर या रेल्वेने सकाळी 5.30 वाजताच प्रवास सुरू केला.सकाळी 10.30 वाजता ट्रेन वर्धा येथे पोहोचली.शनिवारचा दिवस आणि ओपीडी लवकरच बंद होत असल्यामुळे घाईघाईने स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालता ऑटो पकडला. आम्हाला सावंगी मेघे येथील धर्मादाय रुग्णालय…

Read More
Back To Top