
विमा विक्रीतून ग्राहक-कर्मचाऱ्यांचा होतोय छळ! बँकांचा भलताच खेळ
भारतातील बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या विकासासाठी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बँकांना विमा उत्पादनांच्या विक्रीची परवानगी दिल्याने बँकिंग व्यवस्थेचे मूळ उद्दिष्टच भरकटत आहे. विमा कंपन्यांचे जाळे बँकांमार्फत पसरले असून, यामुळे केवळ ग्राहकांचे शोषणच होत नाही, तर बँक कर्मचाऱ्यांवरही अवास्तव दबाव येत आहे. बँकांनी…