घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?

शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.
तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—
” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”
मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?
आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?
तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे
“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.
ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त करतो.
याच शब्दातून पुढे वाण देणे ही संकल्पना रूढ झाली असावी.
“वानूळा” हा शब्द कदाचित “वाणवळा” या शब्दातूनच आलेला असावा.
गावखेड्याची लोकसंस्कृती ही मुळात कृषीसंस्कृती आहे.
ती ब्रह्मा किंवा विष्णूला केंद्रस्थानी मानणारी नसून,
शेती आणि मातीशी घट्ट नातं बांधणारी आहे.
जर ही संस्कृती केवळ देवकेंद्रित असती,
तर आज गावोगावी मारुतीऐवजी ब्रह्मा आणि विष्णूची मंदिरे दिसली असती.
पण वास्तव वेगळं आहे.
शेतीच्या संस्कृतीत ब्रम्हा आणि विष्णुला देव म्हणुन कधीच मान्यता मिळाली नाही.
उलट संत विचाराने प्रभावित
ही संस्कृती निसर्गाचे स्वामित्व आणि अस्तित्व—दोन्ही मान्य करते.

© गजानन खंदारे
जिल्हाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड, वाशिम

app.lagnaakshada.com

कॉपीराइट व डिस्क्लेमर

© गजानन खंदारे.

हा लेख लेखकाच्या वैयक्तिक विचार, अनुभव व लोकसंस्कृतीच्या अभ्यासावर आधारित आहे.लेखातील मजकूर लेखकाची पूर्वपरवानगी शिवाय कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरू नये.

हा लेख कोणत्याही धर्म, देव किंवा श्रद्धेचा अपमान करण्याच्या उद्देशाने लिहिलेला नसून,धर्माच्या नावाखाली झालेल्या सामाजिक विकृतींवर वैचारिक भूमिका मांडतो.

लेखक ✍🏼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top