“हा वाद ‘शिवाजी’ शब्दाचा नाही—आमदाराच्या पातळीचा खरा प्रश्न!”

अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं…

Read More

“गेट आऊट फ्रॉम हेअर!” — बाई, बाटली आणि राजकारणाचा आरसा

हा लेख सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.“गेट आऊट फ्रॉम हेअर!” या एका साध्या वाक्यातून सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, त्रास आणि अस्वस्थता व्यक्त होते.रस्त्यावर अडकलेला नागरिक आणि त्याच्या नावावर चालणारं राजकारण — यामधला विरोधाभास या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीत माणसं आणि माणुसकी हरवते , यापेक्षा आपण रोजच्या गर्दीला सरावलो आहोत असं…

Read More

देव की थोतांड? हरवलो कोण — देव की आपण?

हा विषय अत्यंत खोल आणि गहन आहे. किंबहुना तो तसा म्हणून जास्त खोलात न शिरता, या प्रश्नाचे उत्तर मला ओशो रजनीश यांच्या प्रवचनात व -ग्रंथांत सापडते.त्याच उत्तराचा हा थोडक्यात उहापोह आहे. ईश्वरप्राप्तीच्या शोधात असताना आपली अवस्थाकावळ्यासारखी होत चालली आहे. याची चर्चा वरील मजकुरात आहे .म्हणजे नेमकी कशी तर ..ना आपण जे आहोत ते राहिलो,ना जे…

Read More

माझ्या बापाची वारसा-भेट

✍️ गजानन खंदारेआज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.सळसळणारं रक्तही जणू…

Read More

पिंपळ, पोळे आणि हरवलेला बुद्ध..

कालची ती संध्याकाळची वेळ… आकाशात मंद उजेड शिल्लक होता, आम्ही तिघे—शिवाजी कव्हर, दिलीप भिसडे आणि मी—पार्डी तिखेच्या रस्त्याने लग्नासाठी निघालो होतो. गाडीच्या गतीतही मन कुठेतरी स्थिर होत होतं. तेवढ्यात बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या एका पिंपळावर नजर स्थिरावली…तो पिंपळ—पानगळ झालेला, विरळ फांद्यांनी जणू आकाशाला स्पर्श करणारा— काळाच्या ओघात थकलेला वाटत होता. एके-वेळी हिरवागार असलेला तो वृक्ष…

Read More

“ब्रिगेडी-यन” परशुरामाला का मानत नाहीत ..!

काल अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला गेलो होतो.उदगीर, शिरूर ताजबंद या भागात काही ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचे अश्वारूढ पुतळे दिसले. या भागात महात्मा बसवेश्वरांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि हा परिसर कर्नाटक सीमेच्या जवळच आहे.आज “अक्षय तृतीया” असून आजच “महात्मा बसवेश्वर” यांची जयंती आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देणाऱ्या…

Read More

देवाचा बाजार आणि हरवलेला माणूस! देव तुमच्याच शोधात..!

गेल्या अनेक वर्षांपासून मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वाचन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजून साधा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते. तेव्हा साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात — नेमकं सत्य काय? चराचरात आणि माणसामाणसांत व्याप्त असलेला देव आज ठराविक धर्म विक्रेत्यांची आणि काही…

Read More

भक्ती आणि श्रद्धेचा मूळ मार्ग — एक दृष्टिकोण

आपल्याकडे भक्ती मार्ग सांगणाऱ्या दोन भिन्न परंपरा दिसतात. एक म्हणजे सनातनी कर्मकांड परंपरा.ज्यात “बहूईश्वर” वाद विधी, नियम, पद्धती आणि कर्मकांडांचे पालन महत्त्वाचे मानले जाते. तर दुसरी म्हणजे संतपरंपरेचा भक्ती मार्ग. “एक-ईश्वर” वादज्यात देवापर्यंत पोहोचण्यासाठी भावना, प्रेम, सत्व आणि चांगुलपणा यांना महत्त्व दिले जाते. दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर आहेत, परंतु विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे. समस्या तेव्हा…

Read More

आम्ही देशाचे नागरिक की सरकारी प्रयोगशाळेतील उंदीर?

सर्वत्र “अच्छे दिन” सुरू आहेत,“झोळीवाले” बाबा आणि बुआ बाबा आरामात व्यापार करत आहेत,आणि व्यापारी लोक संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत!पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की झाली आहे —या देशाचा सामान्य माणूस आता या देशाचा मालक राहिलेला नाही,तर सरकारी व्यवस्थेने प्रयोगासाठी तयार केलेला “उंदीर” बनवला गेलाय!हा प्रश्न आता टाळता येणार नाही.हा आरोप नाही —हा रोजच्या अनुभवातून आलेला…

Read More

आ.अमित झनक : एकाकी चर्चा नव्हे — इच्छाशक्तीचा राजकीय श्वास

मागील आठवड्यात रक्तदान शिबिरानिमित्त एका प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मित्रांसोबत सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. विषय होता — ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या, उपचारांची अपुरी उपलब्धता आणि त्यावर उपाय म्हणून उभारता येऊ शकणारे अत्याधुनिक रुग्णालय. या डॉक्टर मित्रांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. हा केवळ कल्पनेतील प्रकल्प नाही; तर…

Read More
Back To Top