देणाऱ्याने काय द्यावे … विंदा
“हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरवी पिवळी शाल घ्यावी;सह्याद्रीच्या कड्यावरून, छातीसाठी ढाल घ्यावी.” विंदाची ही कविता आजही अनेकांच्या स्मरणात आहे..विंदा करंदीकर यांचा आज जन्मदिवस! करंदीकर यांनी मराठी कवितेला नवे विषय, नवी भाषा आणि नवी अभिव्यक्ती दिली. त्यांच्या कवितेत संवेदनशीलता होती, पण त्याचबरोबर तर्क, विद्रोह, सामाजिक भान आणि जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टीही होती. वेड्या पिशव्या ढगांकडून वेडेपिसे आकार…
श्रीयाळशेठ की सक्रोबा !मग हा नेमका कोण?
आपल्या लोकसंस्कृतीची विशेषता कृषी संस्कृतीची पाळमुळे खूप खोलवर अशी रुजलेली दिसतात.ती अनेक अगांनी विस्तारत जाते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा सक्रोबा हा सण या पैकीच आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकसंस्कृतीतील एक वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. याला प्रदेशानुसार श्रीयाळ षष्ठी, शिराळ षष्ठी, श्रीयाळशेठ, संकरोबा, शंकरोबा किंवा भुलोबा अशी वेगवेगळी नावे आढळतात. “नागपंचमी सरली, आला साक्रोबाचा सण, माहेराच्या आठवणीनं भरून…
‘नवसाला पावणारा देव : चमत्काराचे वास्तव की मानसिकतेचे थोतांड!’
✍️ गजानन खंदारे समाजात देवाला “नवस” बोलण्याची परंपरा फार जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. “देवाला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला” म्हणजे देव पावला अशा असंख्य कथा, आख्यायिका आणि अनुभव आपण सतत ऐकत आलो आहोत.या अशा कथातुन नवसाला पावणारे अनेक देव जन्माला आलेत. किंवा घातले गेलेत अनेक देव, देवस्थाने आणि चमत्कार प्रसिद्ध झाले. अनेक ठिकाणांची…
तेव्हा देव कुठे होता ? तर स्मशानातल्या त्या दोन मुस्लिमां हातून , भडाग्नी देत होता ..!!
अल्बम चाळताना अचानक हा फोटो समोर आला…आणि डोळ्यासमोर उभा राहिला तो काळ – भीतीचा, असहायतेचा, आणि माणुसकीची खरी परीक्षा घेणारा…लॉकडाऊनचा तो भयानक काळ…जिथे जिवंत माणूस माणसाला घाबरत होता…जिथे नाती, रक्ताची असोत किंवा जिव्हाळ्याची – सगळी दूर पळाली होती…मृत्यू इतका जवळून फिरत होता की प्रत्येक श्वास भीतीने भरलेला होता…लोक पटापट मरत होते…स्मशानभूमीत प्रेतांचा ढीग लागत होता…आणि…
पी. एस. खंदारे : मला बुद्ध सांगणारा गाडगेबाबा हरपला…!
– गजानन खंदारे मोप (रिसोड) इथल्या संवेदनाहीन सरकारी व्यवस्थेने सुमारे १४ हजार सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला होता. माझ्यासह अनेक सहकारी मित्र व्यथित झाले होते. आम्ही काही जण सरकारशी दोन हात करण्याची भाषा करत होतो; तसेच नियोजनही सुरू होते. शेवटी ८ जानेवारी २०२३ ही तारीख निश्चित झाली. शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही अक्षरशः धावपळ…
“चंपा” च्या मेंदूची ‘फॉरेन्सिक क्रांती’ : आणि नोबेलची शिफारस
✍️ गजानन खंदारे आपला भारत देश आता निर्विवाद जागतिक महासत्ता बनला आहे, यासाठी आणखी कोणतीही सिद्धता किंवा पुरावा देण्याची गरज उरलेली नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात “चंपा”सारखे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपले अवतारकार्य पुढे नेत असताना आपण सर्वच धन्य झालो आहोत!अलीकडेच दिल्लीत काही तरुणांनी आंदोलन केले. त्या संदर्भात “चंपा” यांनी एक विधान केले – त्यांच्या…
स्वतः सोबत देवाला फसवणारी माणसं! आषाढी विशेष ..
आपल्याकडे दोन प्रकारच्या धार्मिक परंपरा रूढ आहेत. एक वैदिक हिंदू परंपरा आणि दुसरी वारकरी विचारांची साधी, सरळ भक्तीमार्गाची परंपरा. दोन्ही परंपरा समांतर चालणाऱ्या असल्या तरी त्यांच्यातील विचारधारा मात्र पूर्णपणे वेगळी आहे.आणि नेमकं इथेच आजच्या काळात गोंधळ निर्माण झाला आहे.अलीकडच्या काळात कीर्तन परंपरेत जशी “कथित” वारकऱ्यांची घुसखोरी झाली.भक्ती मार्गातही आपण आपल्याच मनानुसार घुसखोरी करून घेतली. संस्कृती…
पोरी, तुझं खूप सारं कौतुक!
प्रयत्न केल्याने यश मिळतंच, पण तेच जर योग्य आणि नियोजनपूर्वक झाले, तर ते हमखास आणि लवकर मिळतं. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. याचा अनुभव मला नुकताच आला.माझी मुलगी प्राजक्ता खंदारे-भिसे हि ‘येस बँकेत’ डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत राहून, मागील तीन महिने स्टेट बँकेच्या ‘सर्कल बेस ऑफिसर’ परीक्षेची तयारी करत होती. घड्याळाच्या काट्यावर सकाळी आठ…
जेव्हा नागरिकच शत्रू ठरतात… लोकशाही कुठे उरते?
सरकारी व्यवस्थेच्या अत्याचाराचे अनेक अध्याय आता लिहून झालेत.देशभरात संताप व्यक्त होत असतांना झोपेचे सोंग घेत व्यवस्थेच्या गुलामीची चादर ओढलेल्या सजग नागरिकांनी आता रस्त्यावर येण्याची हिच खरी वेळ आहे नवी दिल्लीतील जंतरमंतरवरून समोर येणारी दृष्ये आणि बातम्या संवेदनशील नागरिकाच्या काळजाला हात घालणाऱ्या ठरत आहेत. लोकशाही देशात आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर, विशेषतः महिलांवर आणि…
मेल्यावरही पोचवण्याची घाईच? नऊ तासांचा प्रवास आणि मनाचे ओझे ! ✍️ गजानन खंदारे
अलीकडे रोजच मरणाच्या बातम्या आणि घटना आपल्या कानावर येत राहतात. त्याचे दुःख आता मनाला भिडण्याऐवजी केवळ शब्दांतच अधिक उतरते आहे, असे मला वाटत असतानाच परवा माझे सासरेबुवांच्या अचानक जाण्याची बातमी आली.जेव्हा नात्यातील एखादी जवळची व्यक्ती अशी अचानक सोडून जाते, तेव्हा त्या नात्यातील परस्पर संवादाच्या खोलीवरच दुःखाचा गहिवर ठरत असतो.बायको पुण्यात असताना तिला ही घटना…
