विष्णुचा नववा अवतार :देव तुमच्याच शोधात..!
आपल्या हिंदू धार्मिक परंपरेत एकीकडे संत विचारांची वारकरी परंपरा, तर दुसरीकडे कर्मकांडप्रधान परंपरा दिसते. वास्तविक या दोन्ही परंपरा विचार, आचार आणि कृतीच्या पातळीवर एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत — गेली अनेक वर्षे मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजूनही नीटसा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव…
भक्ती आणि श्रद्धेचा मूळ मार्ग — एक दृष्टिकोण
आपल्याकडे भक्ती मार्ग सांगणाऱ्या दोन भिन्न परंपरा दिसतात. एक म्हणजे सनातनी कर्मकांड परंपरा.ज्यात “बहूईश्वर” वाद विधी, नियम, पद्धती आणि कर्मकांडांचे पालन महत्त्वाचे मानले जाते. तर दुसरी म्हणजे संतपरंपरेचा भक्ती मार्ग. “एक-ईश्वर” वादज्यात देवापर्यंत पोहोचण्यासाठी भावना, प्रेम, सत्व आणि चांगुलपणा यांना महत्त्व दिले जाते. दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर आहेत, परंतु विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे. समस्या तेव्हा…
आम्ही देशाचे नागरिक की सरकारी प्रयोगशाळेतील उंदीर?
सर्वत्र “अच्छे दिन” सुरू आहेत,“झोळीवाले” बाबा आणि बुआ बाबा आरामात व्यापार करत आहेत,आणि व्यापारी लोक संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत!पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की झाली आहे —या देशाचा सामान्य माणूस आता या देशाचा मालक राहिलेला नाही,तर सरकारी व्यवस्थेने प्रयोगासाठी तयार केलेला “उंदीर” बनवला गेलाय!हा प्रश्न आता टाळता येणार नाही.हा आरोप नाही —हा रोजच्या अनुभवातून आलेला…
आ.अमित झनक : एकाकी चर्चा नव्हे — इच्छाशक्तीचा राजकीय श्वास
मागील आठवड्यात रक्तदान शिबिरानिमित्त एका प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मित्रांसोबत सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. विषय होता — ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या, उपचारांची अपुरी उपलब्धता आणि त्यावर उपाय म्हणून उभारता येऊ शकणारे अत्याधुनिक रुग्णालय. या डॉक्टर मित्रांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. हा केवळ कल्पनेतील प्रकल्प नाही; तर…
तुकाराम महाराजांचे नेमके काय झाले? काही अनुत्तरित प्रश्न
धूळवड — रंग, उत्साह आणि गोंधळाचा दिवस.याच दिवशी तुकाराम महाराज अचानक नाहीसे झाले, अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. श्रद्धेनुसार ते सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता या घटनेचा समकालीन दस्तऐवजी ठोस पुरावा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. काही जण म्हणतील की श्रद्धेच्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर तपासायच्या नसतात; त्या मान्य करायच्या…
मन चंगा तो…!
काल सातारकर बाबा मंदिर सभागृहात संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर जयंती म्हंटलं कीपूजन, फोटो, मिरवणूक, डि जे, फार तर भाषणं आणि औपचारिक कार्यक्रम इतपतच गोष्ट मर्यादित राहते.पण इथे चर्मकार समाजाच्या स्वतःच्या स्थापित प्रबोधिनीने समाजासाठी नेमकं काय केलं आहे, कसं काम केलं आहे, याचा लेखा-जोखाच मांडला.हा लेखाजोखा केवळ माहिती देणारा…
घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?
शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त…
१४ हजार शाळा बंद करून गुरुजी लागले कुत्र्यांच्या मागे!जनगणनेचा “फडतूस” उत्सव
महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून! ✍🏼 गजानन खंदारेमास्तर उर्फ गुरुजींना आमचा अष्टांग-स्पर्श!…आणि अंध-भक्तांना आशीर्वाद!गुरुजी,संक्रांत जवळ आली आहे.वाण घ्यायचं आहे,पण त्याआधी आपल्यालाएक अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्यपार पाडायचं आहे—एव्हाना “फडतूस” सिस्टमचा निरोपआपल्यापर्यंत पोहोचलाच असेल.कुत्र्यांची जनगणना! लग्नासाठी स्थळ शोधताय? मग इथे सर्वच मोफत आहे. Click here 💥 … व्हय,! खरंय ते..विद्यार्थी स्क्रोलिंगमध्ये निपुण झाल्यानेमास्तरांना आताकुत्र्यांची जनगणना…
“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?
धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…
महाराज त्रास सगळ्यांनाच होतो तर..!
सध्या इंदुरीकर महाराज हे टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातच त्यांनी कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवू व लग्नाचा बार याही पेक्षा थाटात उडवू..! अशी धमकीच त्यांच्याच भाषेत सांगायचं तर “कथित अवलादी” ना दिली!पण महाराज…किर्तन ही महाराष्ट्राची समृद्ध अशी परंपरा. “नाचू कीर्तनाचे रंगी..”म्हणत संत नामदेवांनी ही परंपरा सुरू केली. “दया धर्म” सांगणारेकिर्तन कशासाठी? तर वरील अभंगात त्याचा सार…
