माझ्या बापाची वारसा-भेट


✍️ गजानन खंदारे
आज वाऱ्याने आपला प्रवाह जरा बदलला होता.
कधी मंद, तर कधी अचानक झंझावातासारखा उसळत

तो स्वतःभोवती गिरक्या घेत धुळीचे लोट उडवत होता.
तरीही रणरणत्या उन्हात मृगजळाचे पाट स्पष्ट वाहताना दिसत होते.
अवतीभवतीच्या कडक उन्हाला तोंड देत माझा बाप मात्र अजूनही चालतच होता…
उन्हाची पारग वेळ केव्हाच टळून गेली होती.
त्याच्या अंगात आता त्राण, अवसान—काहीच उरले नव्हते.
सळसळणारं रक्तही जणू गोठलं होतं, आणि

अंगातून वाहणारा घामही आता आटून गेला होता.
खोपीच्या अडोशाला ठेवलेल्या एका पालवात

गुंडाळलेली कसलीशी वस्तू त्याने माझ्या हातात दिली…
तो हळूच म्हणाला,
“आता एवढंच आहे तुझ्यासाठी…”
मी चकित होऊन विचारलं, “काय आहे हे?”
तो म्हणाला,
“तुझ्या आजोबांना एका महात्म्याने दिलं होतं.
तुमच्या पिढ्यांच्या उद्धारासाठी हे कामी येईल असं सांगितलं होतं.
बापानं जपून ठेवलं… आता वारसाहक्काने

माझ्याकडे आलं… आणि आता तुझ्याकडे.
मी कधी उघडलं नाही… तुझ्यासाठी सांभाळून ठेवलं.
माझ्याकडे आता दुसरं काहीच नाही…
या व्यवस्थेने सगळं काढून घेतलं…”
बापूचं बोलणं ऐकून मी गोंधळलो.
मनात विचार आला—काहीतरी मौल्यवानच असेल…

सुवर्णमुद्रा, दागिना, किंवा काही तरी मोठं धन…
त्या उत्सुकतेने मी लगबगीने पालव उकलायला सुरुवात केली.
कागदात गुंडाळलेली ती जाड वस्तू हळूहळू उघडत गेलो…
आजोबांना मिळालेली ती भेट—जशीच्या तशीच होती.
आजोबांनी कधी उघडून पाहिली नव्हती…
बापानेही नाही…
ती माझ्यासाठीच जपून ठेवली होती.
आणि अखेर माझ्या हातात आलं—
जगातील महान ग्रंथांपैकी एक—
शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी
क्षणभर मी स्तब्ध झालो…
मनात विचार चमकून गेला—
जर आजोबांनी, बापाने हे केव्हाच उघडून वाचलं असतं,
तर माझ्या बा-चा आसूड या व्यवस्थेवर कोरडे काढत ,

या लादलेल्या गुलामगिरीतून केव्हाच मुक्त झाला असता …
तर कदाचित या झोळीवाल्या बाबांच्या

खुळखुळ्या अवलादी इतक्या माजल्याच नसत्या…
जयंती निमित्त
तमाम फुले प्रेमींच्या विचाराच्या वारसदारांना समर्पित 🙏


जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम

  • बुका लाऊन तुका सांगणाऱ्या “घुसखोरांकडून” बालमनांचा सौदा — ही वारकरी परंपरा की राजकीय दलाली?
    लहान मुले हि अनुकरण प्रिय असतात.चांगले वाईट याची फारशी समज त्यांना नसते .काल आळंदी येथे घडलेल्या घटनेनंतर उभा राहिलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तो संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारा ठरतो . ज्या वारकरी परंपरेने शतकानुशतके संतांच्या शिकवणीचा संयम, समता आणि शांततेचा मार्ग दाखवला, त्याच परंपरेच्या नावाखाली आज काही तथाकथित भोंदू जे स्वतःला नावामागे…
  • “बाग्यासमोर नतमस्तक,छत्रपतीवर मौन!तर्काची हत्या आणि राजकारण” महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?”
    गजानन खंदारे “माजी सरन्यायमूर्ती भूषण गवई स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात, पण ते धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम) यांच्या पाया पडतात. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.त्यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये ” अशी जाहीर टिप्पणी शाम मानव यांनी केली “हे शाम मानव कोण आहेत? त्यांना असा ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार कोणी दिला? हल्ली प्रसिद्धीसाठी ते कुठलीही…
  • “हा वाद ‘शिवाजी’ शब्दाचा नाही—आमदाराच्या पातळीचा खरा प्रश्न!”
    अशा वाचाळ वीरांकडून केवळ दिलगिरी व्यक्त करून हा प्रश्न—किंवा सत्तेचा माज—इथेच संपणार नाही. यावर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे; अन्यथा रस्त्यावर “Get out” म्हणणारेच उद्या घरात घुसण्याचीही हिम्मत ठेवतील. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी व अतिरेकाची भाषा बोलणाऱ्यानी हे वेळेत लक्षात घ्यावं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण या श्रद्धेचं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top